शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

अण्णासाहेब पाटील महामंडळ व्याजच देणार : शासनाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 01:18 IST

कोल्हापूर : राज्यात मराठा समाजाचे मोर्चे निघाल्यानंतर शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनांची पुनर्रचना

ठळक मुद्देनव्या तीन कर्जयोजनांचे निकष जाहीरलाभार्थी तरुणांची मूळ मागणी ही ‘हे कर्ज महामंडळानेच आपल्या निधीतून द्यावे,

विश्वास पाटील ।कोल्हापूर : राज्यात मराठा समाजाचे मोर्चे निघाल्यानंतर शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनांची पुनर्रचना केली असून, प्रत्येकी किमान १० लाख रुपये कर्ज देणाºया तीन नव्या योजना जाहीर केल्या आहेत. शासनाच्या वतीने मंगळवारी त्यासंबंधीचा आदेश काढण्यात आला.

पूर्वीची बीज भांडवल योजनाच रद्द करण्यात आली असून, नव्या तिन्ही योजनांचे कर्ज राष्ट्रीयीकृत बँकांकडूनच घ्यावे लागणार आहे. महामंडळ फक्त त्याचे व्याज दरमहा लाभार्थ्यांच्या नावांवर भरणार आहे. त्यामुळे या योजनेचे स्वरूप कर्ज नव्हे, तर व्याज योजना असे राहणार आहे.

या महामंडळाच्या योजनांचा मराठा समाजातील तरुणांना काहीच लाभ होत नसल्याच्या तक्रारी राज्यभर होत्या.‘लोकमत’ने त्यासंबंधीची वृत्तमालिकाही प्रसिद्ध केली. त्यानंतर शासनाने कर्ज योजनेतील उत्पन्नाची अट सहा लाखांपर्यंत केली; परंतु तरीही कर्जासाठी तरुण या महामंडळाकडे फिरकले नाहीत; म्हणून शासनाने महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमून कर्जयोजनांचा फेरविचार केला व नव्या तीन योजना जाहीर केल्या आहेत.

लाभार्थी तरुणांची मूळ मागणी ही ‘हे कर्ज महामंडळानेच आपल्या निधीतून द्यावे,’ अशी होती; कारण राष्ट्रीयीकृत बँका बेरोजगार तरुणांना दारात उभ्या करून घेत नाहीत. अन्य समाजासाठी महामंडळे स्वनिधीतून कर्ज योजना राबवितात..मग याच महामंडळाला तेवढे राष्ट्रीयीकृत बँकांच्या गळ्यात का बांधता? अशी विचारणा होत होती; परंतु शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. यापूर्वीही गट कर्ज योजनेस १० लाख रुपये मिळत होते; परंतु त्याचा लाभ घेण्यास फारसे कोणी पुढे येत नव्हते. आताही योजनेचे निकष व तिचे स्वरूप पाहता तिला कितपत प्रतिसाद मिळतो याबद्दल साशंकताच जास्त आहे.नव्या योजना अशावैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना : लाभार्थ्यास १० लाखांपर्यंतच्या कर्जाचे व्याज हप्ते नियमित भरल्यास महामंडळ देणार.(व्याजदर १२ टक्के मर्यादा)गट कर्ज व्याज परतावा योजना : १० ते ५० लाखांपर्यंतचे कर्ज मिळणार. त्यावरील व्याज ५ वर्षे देणार. कर्ज १५ लाखांपर्यंत असेल तर व्याजाची रक्कम दरमहा देणारगट प्रकल्प कर्ज : शेतकरी उत्पादक गटांना १० लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी मिळणार.